Posts

Showing posts from August, 2020

होयसळ राज्य

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद                  होयसळ राज-  होयसळ हे इतर प्रसिद्ध घराण्यांप्रमाणे सोमवंशी यदु कुलांतील होत. पोयसळ, चोयसळ, होयसळ, व होयसण वगैरे त्यांचीं निरनिराळीं नांवे आहेत. ह्या घराण्याची पौराणिक वंशावळ प्रथम इ. स. १११७ च्या एका ताम्रपटांत, म्हणजे बहुधां हें घराणें उदायास आणणारा विष्णुवर्धन याच्या वेळी, दिलेली आढळते. ऐतिहासिक वंशावळ विनयादित्यापासून (इ.स. १०४८) सुरू होते. त्यांचा इतिहासप्रसिद्ध पहिला राजा बिट्टिदेव उर्फ बिट्टिग ह्यानें द्वारसमुद्र शहर स्थापून तेथें सन ११११ पासून ११४१ पावेतों राज्य केलें. आरंभीं या राजाचा आश्रय जैन धर्मास होता, आणि त्याचा प्रधान गंगराज यानें पुष्कळ जैन मंदिरें बांधिलीं. परंतु रामानुजानें (१०१६-११३७) यावेळीं भक्तिमार्ग सुरू केला, त्याचा परिणाम बिट्टिदेवावर होऊन तो वैष्णव धर्माचा उपासक बनला. त्यानंतर विष्णुचीं उत्कृष्ट मंदिरें त्यानें द्वारसमुद्र व इतरत्र बांधिली. त्यानें स्वत: आपलें नांवहि विष्णुवर्धन असें धारण केलें. विष्णुवर्धनानें व त्याच्या अनुयायांनी...

वऱ्हाडी

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड वऱ्हाड  - याचा विस्तार, व्यापार, राज्यकारभार व शिक्षण वगैरेबद्दल माहिती ‘मध्यप्रांत व वऱ्हाड’ (विभाग १८) या लेखांत दिली आहे. त्याशिवाय बाकीची माहिती येथें देतों. याच्या उत्तरेस गाविलगड व मेळघाट आणि दक्षिणेस बालाघाट (अंजठापर्वत) आहे. पूर्वेस वर्धा नदी व पश्र्चिमेस खानदेश जिल्हा आणि निजामाचें राज्य आहे. या मध्यप्रदेशाचें जुनें नांव पाइनघाट होतें; आणि मेळघाट, पाइनघाट, व बालघाट हीं तीन नांवें या प्रदेशाचे तीन स्वाभाविक भाग निर्दिष्ट करतात. वऱ्हाड या नांवाची व्युत्पत्ति निश्र्चित नाहीं. महाभारतांत विदर्भ शब्द देश व राज्यवाचक आला आहे. रूक्मिणी, शिशुपालाशीं लग्न लागण्यापूर्वी उमरावती येथील अंबा देवीच्या मंदिरांत दर्शन घेण्याकरितां गेली, तेव्हां रूक्मीराजाबरोबर पुष्कळ वऱ्हाड होतें, त्यावरून हें ‘वऱ्हाड’ नांव पडलें अशी एक दंतकथा आहे. अबुलफजल यानें हा शब्द वर्धा (नदीचें नांव) व तट म्हणजे तीर यापासून आला आहे असें म्हटलें आहे. पाइनघाटावरील दक्षिणप्रदेशांत गाविलगडाच्या टेंकडया अतिशय उंच (३४०० फूट) आंहेत. बालाघाटावरील सपाट प्रदेश मेळघाटापेक्षां उंच नाहीं. मुख्य नध्य...

कैकोलन— एक कोष्टी जात.

कैकोलन—  एक कोष्टी जात. यांची एकंदर लो.सं. (१९११) ३७३२९७ आहे. बहुतेक मद्रास इलाख्यांतच आहेत. तेलगू प्रांतांत व दक्षिणेकडील सर्व जिल्ह्यांत कैकोलन जातीचे तामीळ कोष्टी राहात असून ते तेलगू भाषाच बोलतात. अशी एक दंतकथा आहे कीं, मदुरेच्या नायक राजांनां कैकोलनांचें काम पसंत न पडल्यामुळें त्यांनीं उत्तरेकडून पटनूलकारन कोष्टी आणविले; व त्यांचीच संख्या पुढें जास्त झाली. संस्कृत वीरबाहु शब्दाचा समानार्थी तामीळ शब्द कैकोलन असा आहे व वीरबाहु हाच आपला मूळ पुरुष होय अशी या जातीची समजूत आहे. कैकोलन लोकांनां सेनगुंडार म्हणजे रक्तखंजीर असें म्हणतात. व त्याविषयीं दंतकथाहि आहेत. कै म्हणजे हात व कोल म्हणजे घोटा, अशी कैकोलनची व्युत्पत्ति आहे. हातमागाच्या विविध भागांनां हे लोक देवता व ऋषी समजतात. धागा हा विष्णूच्या नाभिकमलांतून प्रथम उत्पन्न झाला, बाणा म्हणजे एक देवता, ताणा म्हणजे नारद, पावटी हा वेदमुनि, फलक म्हणजेच ब्रह्म आणि ताणा बांधण्याचा मुख्य दोर म्हणजे आदिशेष होय. अशा तर्‍हेच्या श्रद्धामय कल्पना मागाविषयीं कैकोलन कोष्ट्यांच्या आहेत. कित्येक ठिकाणीं खालील पोटजाती आढळून येतात:- सोझिया, रट्टू, सिरुता...

चालुक्य घराणें -

विभाग तेरावा : घ - जलपैगुरी चालुक्य घराणें  - चालुक्य घराण्याचें राज्य मोठें विस्तीर्ण असून यांनीं इ. स. सहाव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत सहा शतकें राज्य केलें. या कालापैकीं बराचसा काल हें एक बलिष्ठ राष्ट्र समजलें जात असे. चालुक्य दक्षिणेंत आल्याबद्दलची माहिती प्रथम आपणांस सुमारें इ. स. ५५० च्या सुमाराची मिळते. पहिला पुलकोशी यानें इ. स. ५५० च्या सुमारास आपली सत्ता स्थापन केली. या घराण्याचे पुष्कळ शिलालेख आहेत व त्यांपैकीं शेवट शेवटच्या राजांच्या शिलालेखांतून या घराण्याची वंशावळ दिली आहे. तसेंच यांच्या मूठपुरुषाबद्दल, अयोध्येमध्यें राज्य करीत असलेला सोमवंशांतील ५९ पुरूष विजयादित्य ( अयोध्येस ५९ पुरूष होऊन गेल्यावर विजयादित्य हा दक्षिणेत आला ) हा मुलुख जिंकण्याकरितां दक्षिणेंत आला पण लढाईंत मारला गेला अशी माहितींहि दिली आहे. या विजयादित्याची स्त्री गरोदर असून आपला जीव बचावून पळून गेली व एका ब्राह्मणाच्यां घरीं आश्रयास राहिली. तेथें तिला विष्णुवर्धन नांवाचा पुत्र झाला. यानें विष्णुगिरीवर तप करून गौरीला प्रसन्न करून घेतलें व मग राज्य स्थापून पुष्कळ विजय संपादन केले व कांची येथील प...

कंस - यदुकुलोत्पन्न सात्वतपुत्र

कंस  - यदुकुलोत्पन्न सात्वतपुत्र जो अंधक, त्याच्या वंशांत जन्मलेल्या उग्रसेन राजाच्या नऊ पुत्रांतील ज्येष्ठ.  हा कालनेमि नामक असुरांशानें जन्मला होता म्हणून स्वभावतःच दुष्टबुद्धीचा असे.  जरांसधकन्या अस्ति आणि प्राप्ति या दोघी याच्या बायका होत्या.  चुलता देवक राजा, याच्या देवकी कन्येचा विवाह वसुदेवाशीं यानें मोठ्या समारंभानें केला; व त्या वधुवरांस रथारूढ करून आपण सारथी होऊन, नगरांतून मिरवीत निघाला असतां, मार्गांत देववाणीनें त्यास असें सांगितलें कीं या देवकीचा अष्टम गर्भ तुला मारील.  त्यावरून त्यात तत्काळ देवकीवर खड्ग उपसलें.  तेव्हां वसुदेवानें हिला जें जें अपत्य होत जाईल तें तें मी तुला आणून देत जाईन असें कंसाला वचन दिलें.  त्यावरून त्यानें देवकीस सोडून दिलें. वसुदेव बोलल्याप्रमाणें झालेलें अपत्य देतो कीं न देतो अशा संशयावरून त्यास व देवकीस आपल्या समीप प्रतिबंधांत ठेवावें असें कंसाच्या मनांत आलें.  परंतु उग्रसेन ही गोष्ट न ऐकेल म्हणून यानें प्रथम उग्रसेनास प्रतिबंधांत ठेविलें व आपण राज्य चालवूं लागला, व वसुदेवदेवकीस प्रतिबंधात ठेविलें.  प्रति...

Pindari

Image
Pindari Villagers burning themselves to avoid Pindaris, 1815 पिंडारिस टाळण्यासाठी गावकरी स्वत: ला जळत आहेत, 1815 The  Pindaris  were  irregular military  plunderers and foragers in 17th- through early 19th-century  Indian subcontinent  who accompanied initially the  Muslim  army, later the  Maratha  army, and finally on their own before being eliminated in 1817-18 Pindari War. [1]  They were unpaid and their compensation was entirely the loot they plundered during the war. [1]  They were horsemen, foot brigades and partially armed, creating chaos and delivering intelligence about the enemy positions to benefit the army they accompanied. [2]  The earliest mention of them is found during  Aurangzeb 's campaign in the Deccan, but their role expanded with the Maratha armed campaign against the  Mughal empire . [2]  They were highly effective against the enemies given their rapid and chaotic thrust into enemy ter...